श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा रुपये २१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र वृध्द व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून दरमहा रु. १५०० इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
लाभार्थी:
सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
फायदे:
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये १५००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.