नागरी हक्क संरक्षण अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे.
केंद्र पुरस्कृत योजना (50% राज्य व 50% केंद्र)
शासन निर्णय
- नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989
योजनेचा मुख्य उद्देश
- अस्पृश्यता निर्मुलन करणे व समाजाचे प्रबोधन करणे.
लाभाचे स्वरुप
- तालुका स्तरावर शिबीर :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समिती सदस्य इ. साठी वर्षातून तीन शिबीर आयोजित करण्यासाठी रु 12000/- इतके अनुदान पंचायत समितीला देण्यात येते.
- खेडेगावांना पारितोषिक: प्रत्येक जिल्हयामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या खेडेगावांना परितोषिक देण्यात येते. प्रथम पारितोषिक रू 3000/- व व्दितीय पारितोषिक रु 2000/-.
- निबंध स्पर्धा : अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक जिल्हयातील विद्यालय व महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करणे. प्रथम परितोषिक रु 1000/-, व्दितीय रु 750/- तृतीय रु 500/-.
- वक्तृत्व स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक जिल्हयातील विद्यालय व महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. प्रथम पारितोषिक रु 1000/- व्दितीय क्र. रु 750/- तृतीय रु 500/-.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
वरील प्रमाणे