बंद

    कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.
    • या योजनेंतर्गत लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 60 वर्ष असावे.
    • भूमिहीन शेतमजूर परिवक्ता स्त्रिया / विधवा स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात यावे.

    लाभार्थी:

    अनूसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांसाठी

    फायदे:

    लाभार्थ्यास 100% शासकीय अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.