इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ४० ते ७९ वर्ष वयोगटातील विधवा महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमधून केंद्र शासनाकडून दरमहा रु.३००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
- याच लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दरमहा रु.१२००/- असे एकूण रु.१५००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
लाभार्थी:
सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
फायदे:
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये १५००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.