महिला किसान योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
- (अ)अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८,०००/ व शहरी भागासाठी रु.१,२०,०००/ पर्यंत असावे.
- (ब)राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१,००,०००/ पर्यंत असावे.
- जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
- अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
अ.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
१ | २०२१-२२ | २५० | ५ |
२ | २०२२-२३ | ४०० | ८ |
३ | २०२३-२४ | – | – |
लाभार्थी:
अनुसूचित जातीतील चर्मकार समाज
फायदे:
या योजने अंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा सात/बाराचा उतारा आहे किंवा पतिपत्नी या दोघांच्या नावावर सात/बारा उतारा आहे अथवा पतीच्या नावांवर सात/बारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्रा-ारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नांवे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस रु.५००००/ पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये रु.१००००/ अनुदान व उर्वरित रक्कम रु.४००००/ कर्ज स्वरुपात ५ टक्के व्याज दराने मंजूर करण्यांत येते. सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यांत येते.
अर्ज कसा करावा
अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.