कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन, शेतमजूर व दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत.
- सामाजिक क्षेत्रात कमीत कमी १५ वर्षे कार्य केलेले असावे.
- एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.
- हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म,लिंग, क्षेत्र ह्या गोष्टींचा विचार केला जाणार नाही.
पुरस्काराचे स्वरुप (व्यक्ती)
एका व्यक्तीला रु. २१ हजार एक (धनाकर्ष)
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)
- समाज कल्याण क्षेत्रात व अनु. जाती व नवबौध्द समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मुलन, अंधश्रध्दा रुढी निर्मुलन, जनजागृती, भूमीहिन शेतमजूर यांचे कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल.
- वरील समाज कल्याण क्षेत्रात १० वर्ष कार्य असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल.
पुरस्काराचे स्वरुप (संस्था)
एका संस्थेला रु. ३० हजार एक (धनाकर्ष)
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सर्व नमुद कागदपत्रांसह दाखल करावेत.