बंद

    रमाई आवास योजना (ग्रामीण व शहरी)

    • तारीख : 15/11/2008 -

    राज्य पुरस्कृत योजना

    योजनेचे शासन निर्णय :-

    • शासन निर्णय क्र. बी.सी.एच.-2008/प्र.क्र.36/मावक-2, दि.15.11.2008
    • शासन निर्णय क्र. बी.सी.एच.-2009/प्र.क्र.159/मावक-2, दि. 9.03.2010
    • शासन निर्णय क्र. रआयो-2016/प्र.क्र.578/बांधकामे, दि. 30.9.2016 व 7.01.2017
    • शासन निर्णय ग्राम विकास विभाग क्र. प्रआयो-2017/प्र.क्र.60/ योजना-10, दि. 14.7.2017
    • शासन निर्णय क्र. रआयो-2017/प्र.क्र.357/बांधकामे, दि.1.10.2018 व दि. 13.02.2019

    योजनेचा मुख्य उद्देश

    • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बेघर व्यक्तींना स्वत:च्या मालकीचे घर उपलब्ध व्हावे.

    योजनेचे प्रमुख अटी

    • अर्जदार अनुसूचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील असावा.
    • अर्जदाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे.
    • लाभार्थ्याच्या नावे स्वत:ची जागा / कच्चे घर असावे.
    • यापूर्वी इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    • लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण-2011 (SECC-2011) च्या प्राधान्यक्रम यादीच्या निकषाबाहेरील असावा.
    • दिनांक 1.01.1995 रोजी राज्य शासन, महानगरपालिका, नगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्था, एमएमआरडीए, शासनाचे उपक्रम यांच्या जमिनीवर अतिक्रमण करुन त्या ठिकाणी राहात असून त्यांचे घरकुल / निवासस्थान सदर जमिनीवर असल्यास आणि त्यांना संरक्षित झोपडीदार म्हणून संरक्षण प्राप्त झालेले असल्यास, अशा लाभार्थ्यांसाठी 7/12 उतारा सादर करण्याची अट शासन निर्णय दिनांक 15.3.2016 नुसार शिथिल करण्यात आली आहे.

    योजनेचे लाभाचे स्वरुप

    • शासन निर्णय दिनांक 7.01.2017 नुसार योजनेत खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.
    क्र. क्षेत्र खर्चाची मर्यादा

    (रु.लाखात)

    लाभार्थी हिस्सा उत्पन्न मर्यादा

    (रु.लाखात)

    घरकूलाचे क्षेत्रफळ
    अ) ग्रामीण 1.32 निरंक 1.20 269 चौ.फु.
    डोंगराळ / नक्षलग्रस्त 1.42 निरंक 1.20 269 चौ.फु.
    ब) न.पा./ न.प. 2.50 7.5 टक्के 3.00 323 चौ.फु.
    क) म.न.पा 2.50 10 टक्के 3.00 323 चौ.फु.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण